देश विदेशNews

माझ्यासोबत झाले ते मुलांसोबत होऊ नये; मुकेश अंबानी तयार करत आहेत फॅमेली काउंसील

मुंबई: धीरुभाई अंबानी यांच्या निधनानंतर काही वर्षातच मुकेश आणि अनिल अंबानी यांच्यात मतभेद सुरू झाले. संपत्ती वाटपावरून या दोघांच्यात अनेक वर्ष वाद सुरू होता. या गोष्टीचा अनुभव घेतल्यानंतर आता मुकेश अंबानी यांनी एक धडा घेतला आहे. ज्यामुळे उत्तराधिकारी निवडण्याची प्रक्रिया निट होईल.

जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी एक फॅमेली काउंसीलची निर्मिती करत आहेत. या संदर्भात महिती देणाऱ्या दोघा व्यक्तींनी सांगितले की,

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा उत्तराधिकारी निश्चित करण्यासाठी फॅमेली काउंसीलची निर्मिती केली जाईल. यात कुटुंबातील सर्व सदस्यांना बरोबरीचे स्थान असेल. काउंसिलमध्ये अंबानीचे पुत्र आकाश, अनंत आणि ईशा यांचा देखील समावेश असेल.

येणाऱ्या काही वर्षात रिलायन्सची धुरा मुकेश अंबानी यांच्या मुलांच्या हातात असेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत मुकेश अंबानी त्यांचा उत्तराधिकारी निश्चित करतील. फॅमेली काउंसीलची निर्मिती ही उत्तराधिकारी निश्चित करण्याच्या प्रक्रियेचा एक भाग आहे. यात कुटंबातील व्यक्तींसह एका बाहेरच्या सदस्याचा समावेश असेल. जो मेंटर आणि सल्लागार म्हणून काम करेल.

काउंसील रिलायन्स संदर्भात निर्णय घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. या माध्यमातून व्यवसाया संदर्भात महत्त्वाचे निर्णय घेतले जातील. मुकेश अंबानी यांच्या ८० अब्ज डॉलर संपत्तीसंदर्भात स्पष्ट चित्र तयार असावे. जेणे करून भविष्यात जर वाटणी करायची झाली तर कोणताही वाद निर्माण होऊ नये. मुकेश आणि अनिल यांच्यात जितका वाद झाला होता तो पाहता मुकेश अंबानी खुप काळजी घेत असल्याचे दिसते.

धीरूभाई अंबानी यांच्या नेतृत्वाखाली ८० आणि ९०च्या दशकात रिलायन्सची वाटचाल जोरदार झाली होती. पण २००२ मध्ये त्यांच्या निधननंतर गोष्टी बिघडू लागल्या. दोन्ही भावांच्यात वाद सुरू झाले आणि अखेर वाटणी करावी लागली. अनिल अंबानी यांच्या वाटेला कम्युनिकेशन, पॉवर आणि कॅपिटल हे बिझनेस आले. तर मुख्य अंबानी यांना रिलायन्स इंडस्ट्रीजचा वाटा मिळाला.

मुकेश आणि अनिल यांच्यात जो वाद झाला तो मिटवण्यासाठी खुद्द आईला मध्यस्थी करावी लागली. २००४ मध्ये या दोघातील वाद समोर आला. आई कोकिला बेन यांनी कंपनीचे दोन भाग केले आणि त्याची वाटणी केली. ही वाटणी करत असताना आयसीआयसीआय बँकेचे तत्कालीन चेअरमन कामत यांची देखील मदत घेण्यात आली होती. हा वाद ४ वर्ष सुरू होता.