महाराष्ट्रमराठवाडा

जालन्यात होणारा ‘शासन आपल्या दारी’ मराठा आरक्षणाचं आंदोलन चिघळल्यामुळे ‘चल पुढच्या दारी…’

जालना : पोलिसांकडून मराठा आंदोलकांवर काल  झालेल्या लाठीमारानंतर मराठा समाज संतप्त झाला आहे. जालन्यासह राज्यभर तणावाचे वातवरण आहे. या पार्श्वभूमीवर  8 सप्टेंबरला  जालना येथे होणाऱ्या  शासन आपल्या दारी या कार्यक्रमाची तारीख पुढे ढकलली आहे.  यापूर्वी दोन वेळा या कार्यक्रमाची तारीख बदलण्यात आली होती. आता मराठा आरक्षणाचे आंदोलन चिघळल्यानंतर तिसऱ्यांदा या कार्यक्रमाची तारीख बदलण्यात आली आहे. आता हा कार्यक्रम 16 सप्टेंबरला जालन्यात पार पडणार असल्याची माहिती मिळत आहे.