महाराष्ट्र

महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमीवर गर्दी नको- मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं आवाहन

23 Nov :- कोरोना विषाणूचे वाढते थैमान आटोक्यात येत असताना दिवाळीनंतर पुन्हा कोरोनाचे थैमान वेगाने वाढू लागले लागले आहे. याच पार्श्वभूमीवर काल सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातील जनतेला महत्वपूर्ण आवाहन केले आणि लॉकडाऊन करायला लावू नका असा कडक इशारा सुद्धा दिला. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 6 डिसेंबर रोजीच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनाच्या अनुषंगाने दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक झाली.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

महापरिनिर्वाण दिन हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा दिवस आहे. या अभिवादनासाठी ज्या-ज्या गोष्टी करायच्या, त्या सर्व गोष्टी केल्या जातील. त्यामध्ये कुठेही कमीपणा येऊ देणार नाही. पण कोरोना संकटामुळे यावर्षी मात्र जनतेने अभिवादनासाठी मुंबईतील चैत्यभूमीवर गर्दी करू नये. परिस्थितीचे भान ओळखून या अनुयायांनी आपल्या कृतीतून विचारांची प्रगल्भता दाखवावी,’ असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

वाचा :- बीड- अखेर बापानेच मुलाला स्वतःचे आतडे देऊन वाचविला जीव

महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीनेही 6 डिसेंबर रोजी अनुयायांना अभिवादनासाठी मुंबईत न येण्याचे आवाहन केले आहे. या भूमिकेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वागत केलं. तसंच समितीने चैत्यभूमी येथील अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने केलेल्या सूचनांच्या कार्यवाहीबाबत संबंधित यंत्रणांनी कार्यवाही करावी, असे निर्देशही दिले.

वाचा :- CM ठाकरेंचा कडक इशारा! राज्यात पुन्हा लॉकडाऊनची वेळ आणू नका

त्यानुसार महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवरील मानवंदना, अभिवादन आणि दर्शनाचे थेट प्रक्षेपण, विविध माध्यमातून ऑनलाईन दर्शन, स्मारकावर हेलिकॉप्टरद्वारे पृष्पवृष्टी यांसह विविध सुविधा यांचे नियोजन करण्यात येणार आहे.

वाचा : शरद पवार मराठा समाजाकडे दुर्लक्ष का करतात? – मेटे