सिनेमा,मनोरंजन

‘या’ कारणामुळे जावेद अख्तर यांनी कंगनाविरोधात दाखल केली तक्रार

कंगना रणौतविरोधात मानहानीची तक्रार दाखल केली

3 Nov :- कंगना रणौतच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. प्रसिद्ध लेखक, गीतकार जावेद अख्तर यांनी अभिनेत्री कंगना रणौतविरोधात मानहानीची तक्रार दाखल केली आहे. कंगनाने अनेकदा प्रसारमाध्यमांसमोर जावेद अख्तर यांच्यावर आरोप केले होते. त्याला उत्तर देत जावेद अख्तर यांनी आता कोर्टामध्ये धाव घेतली आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

कंगना आणि हृतिक रोशन यांच्यातला वाद तर सर्वज्ञातच आहे. कंगनाने जावेद अख्तर यांच्याविरोधात मुलाखतीमध्ये काही गौप्यस्फोट केले होते.

वाचा :- 200 हून अधिक भाजप कार्यकर्त्यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश

कंगना रणौत म्हणाली होती, “एकदा जावेद अख्तर यांनी मला त्यांच्या घरी बोलवलं आणि सांगितलं की, हृतिक रोशन आणि राकेश रोशन ही मोठी माणसं आहेत. जर तू त्यांची माफी मागितली नाहीस तर तुझ्या करिअरसाठी ते धोकादायक होऊ शकतं. ते तुला तुरुंगात टाकतील. तुझं आयुष्य बरबाद होईल. तुला आत्महत्याच करावी लागेल. अशा शब्दामध्ये जावेद अख्तर यांनी मला धमकी दिली होती. ते माझ्यावर एवढे ओरडत होते की, मी घाबरुन थरथर कापायला लागले होते.”जावेद अख्तर यांनी मला अशा धमक्या दिल्या हे कंगनाने अनेकदा मीडियासमोर सांगितलं आहे.

वाचा :- अमिताभ बच्चन विरोधात पोलिसांत तक्रार दाखल!

वाचा :- आमिर खानच्या मुलीचे झाले लैगिंक अत्याचार

वाचा :- केंद्र सरकार हळूहळू आणीबाणी आणू पाहत आहे