राजकारण

पंतप्रधान खोटं बोलत आहेत-गांधी

२६ जून :-भारत आणि चीन दरम्यानच्या सीमावादावर आरोप -प्रत्यारोपांचं सत्र अजुन सुरूच आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा खोटं बोलत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.लष्करचे माजी अधिकारी, सॅटेलाईटवरून घेतलेले फोटो, पत्रकार, असे सगळेच लोक चीनने एक नाही तर तीन ठिकाणी जमीन घेतली असं सांगत आहेत त्यामुळे पंतप्रधानांनी स्पष्टीकरण दिलं पाहिजे. चीनने भारताची जमीन बळकावली असेल तर नरेंद्र मोदींनी सरळ सरळ सांगावं सर्व देश सरकार सोबत आहे.