महाराष्ट्र

औरंगाबादमध्ये मनसेचा आक्रमक पवित्रा!

२६ जून:-औरंगाबादमधील दॆवसेन्दिवस वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येवरून मनसेने आज आपल्या नेहमीच्या स्टाईल मध्ये महापालिका कार्यालयातच आक्रमक पवित्रा घेतला . दिवसेंदिवस शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.आणि बाधित रुग्णांच्या मृत्यूचा आकडाही वाढत आहे.या सगळ्यांमध्ये महापालिका आणि प्रशासन कुचकामी ठरल्याचा आरोप मनसेने केला आहे. आता महापालिका आयुक्तच क्वारंटाइन झाले आहेत. त्यामुळे उपयुक्त रवींद्र निकम यांच्याकडे सूत्रे आहेत.मनसेचे नेते सुहास दशरते यांनी प्रशासनाला जाब विचारला मात्र समाधान कारक उत्तर मिळाले नसल्याने त्यांनी उपयुक्त निकम यांच्यावर खुर्ची फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षा रक्षकांनी खुर्ची धरल्याने पुढील अनर्थ टळला.