भारत

मोठी बातमी! एक्सप्रेस रुळावरुन घसरली; 5 जणांचा मृत्यू तर 20 जखमी

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

13 Jan :- बंगालच्या जलपाईगुड़ी येथे आज संध्याकाळी पाच वाजेदरम्यान एक मोठी रेल्वे दुर्घटना घडली आहे. बिकानेर-गुवाहाटी एक्सप्रेसचे 12 डब्बे रुळावरुन घसरले आहेत. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर अनेक प्रवाशी रेल्वेच्या डब्ब्यात अडकल्याची माहिती मिळत आहे. सध्या घटनास्थळी बचावकार्याचे काम सुरू आहे. मात्र अंधार पडल्याने बचावकार्यात अडथळा निर्माण होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनेनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी फोनवर संवाद साधून, घटनेचा आढावा घेतला. बिकानेर एक्सप्रेस ही मंगळवारी रात्री बिकानेरहून रवाना झाली होती. तर गुरुवारी सकाऴी 5.44 वाजता रेल्वे पटनाहून गुवाहाटीकडे रवाना झाली होती.

या अपघातात सुमारे 20 पेक्षा अधिक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. सध्या घटनास्थळी एनडीआरएफची टीम रवाना झाली असून, बचावकार्य सुरू आहे. या बिकानेर एक्सप्रेसने सुमारे 700 प्रवाशी प्रवास करत असल्याची माहिती मिळत आहे.