सिनेमा,मनोरंजन

हृतिक तू कब तक रोएगा; कंगना पुन्हा संतापली!

कंगनाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

14 Dece :- बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री कंगना रणौत यांच्यातील वादाप्रकरणातील गुन्ह्याचा तपास सायबर सेलकडून गुन्हे शाखेच्या सीआययू युनिटकडे देण्यात आला आहे. यानंतर आता कंगनाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कंगना राणौतने माझी बदनामी करण्यासाठी आणि मानसिक त्रास देण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केल्याचा आरोप करत 2016 साली हृतिक रोशनकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

सायबर सेलने इतके दिवस तपास करून आता हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग केलेलं आहे. या घडामोडीनंतर आता कंगनानेही हृतिकला बोचरा सवाल केला आहे. ‘त्याची विचित्र गोष्ट पुन्हा सुरू झाली आहे. आमच्या ब्रेकअपला अनेक वर्ष लोटल्यानंतरही तो त्यातून बाहेर पडायला तयार होत नाही…दुसऱ्या महिलेला डेट करायला तयार होत नाही. जेव्हा मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात पुढे जाण्यासाठी धैर्य गोळा करते तेव्हा तो पुन्हा त्याचं नाटक सुरू करतो.

हृतिक तू कब तक रोएगा एक छोटे से अफेयर के लिए?’ असं ट्वीट कंगनाने केलं आहे. दरम्यान, कंगना-हृतिक प्रकरणातील तपास सायबर सेलने गुन्हे शाखेकडे वर्ग केल्याने आणि त्यानंतर कंगनाने हृतिकला डिवचल्याने हा वाद आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. कंगनाच्या टीकेवर हृतिक रोशन काय उत्तर देतो, हे पाहावं लागेल.