बीड

आष्टी तालुक्यात बिबट्याने मुलास पळवले

ग्रामीण भाग बिबट्याच्या दहशदीखाली

27 Nov :- गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील काही खेडे गावांमध्ये बिबट्याने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. बीड जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागातील नागरिक बिबट्याच्या दहशदीखाली सध्या जगत आहेत. दोन दिवसांपूर्वीच बिबट्याने एका नागरिकांच्या नरडीचा घोट घेतला आहे. तर अनेक गावकऱ्यांना बिबट्याचे दर्शन देखील घडून आले आहे. आताच हाती आलेल्या माहितीनुसार आष्टी तालुक्‍यातील सुरुडी येथे तरुण शेतकरी नागनाथ गर्जे या शेतक-याचा बळी घेतल्यानंतर सुरुडीपासून जवळच असलेल्या किन्ही येथे बिबट्याने दुसरा बळी घेतला आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

शुक्रवारी दि.२७ नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास बिबट्याने शेतातील विहिरीवर पाणी देण्यासाठी गेलेल्या १० वर्षीय स्वराज ऊर्फ यश सुनील भापकर या बालकावर झेप घालून उचलून नेले. काही वेळात परिसरात या बालकाचा छिन्नविछित्र स्थेतील मृतदेह आढळून आला.या घटनेने परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.आष्टी तालुक्‍यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा उच्छाद सुरू आहे.

वाचा :- ‘या’ बंडखोर नेत्याची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी

मोराळा पंचायत समिती गणाच्या सदस्या सौ.आशा गर्जे यांचे पती नागनाथ गर्जे यांना बिबट्याने मंगळवारी भरदिवसा शेतात हल्ला करून ठार केले.शेतात तुरीला पाणी घालत असताना ही घटना घडली.या घटनेला दोन दिवस उलटत नाहीत.तोच आज शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.स्वराज हा मूळचा श्रीगोंदा तालुक्यातील खराटवाडी येथील रहिवासी आहे. तो दिवाळीनिमित्त आजोळी आजीकडे आला होता.

वाचा :- बीड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांची बदली!

शुक्रवारी तो मावशीच्या पतीबरोबर (काका) तो शेतातील तुरीच्या पिकाला पाणी देण्यासाठीची विहिरीवरील मोटार चालू करण्यासाठी गेला होता.यावेळी तुरीच्या पिकातून आलेल्या बिबट्याने झेप घेत काकासमोर स्वराजला मानेला पकडून उचलून नेले. काकाने आरडाओरडा केला.त्यानंतर शोधाशोध केली असता जवळच्याच डोंगराळ भागात स्वराजचा छिन्नविछित्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला.आष्टी तालुक्‍याला लागून असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील केळवंडी,मढी व शिरापूर या तीन गावांत बिबट्याने आठवडाभराच्या अंतराने तीन बालकांना पालकांसमोर उचलून नेत ठार केले होते.त्यानंतर वन विभागाने येथे विशेष मोहीम राबवून तीन बिबटे जेरबंद केले. त्यातील एक मादी बिबट्या तालुक्‍यातील सावरगाव
(मच्छिंद्रनाथगड ) परिसरातील पिंजऱ्यांत अडकला.आता नरभक्षक बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाने पावले उचलावीत अशी मागणी होत आहे.

वाचा :- बिलाविरोधात मनसेच्या राज्यव्यापी आंदोलनाला पोलिसांनी चिरडले

स्वराज भापकर हा श्रीगोंदा तालुक्यातील रहिवासी आहे.तो आजोळी काकडेची किन्ही येथे दिवाळीनिमित्त आलेला होता.बिबट्याने सुरुडी येथील गर्जे या शेतकऱ्याला ठार केलेल्या सुरुडी या गावापासून काकडेची किन्ही हे गाव
आठ किलोमीटर अंतरावर आहे.आष्टी तालुक्‍याच्या डोंगरपट्ट्यातील ही गावे आहेत.तीन दिवसांत बिबट्याने दोन बळी घेतल्याने परिसरातील गावांसह आष्टी तालुक्‍यात दहशत पसरली आहे. गुरुवारी दि.२६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वा, मुर्शदपूर – आष्टी शहराजवळ तसेच धानोरा,वाघळूज भागात तसेच आजही शुक्रवार दि.२७ नोव्हेंबर शहरानजीक वारंगुळेवस्तीवर बिबट्या दिसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

वाचा :- राज्य शासनाचा मोठा निर्णय! वेश्याव्यवसायातील महिलांना मिळणार 5 हजार रुपये महिना