राजकारण

मनसे सुपारी घेतल्याशिवाय काम करू शकत नाही

शिवसेनेचे अनिल परब यांनी केली टीका

23 Nov :- ‘बदलत्या राजकारणाची नांदी आहे का माहिती नाही. पण मनसे सुपारी घेतल्याशिवाय काम करू शकत नाही. कारण, त्यांच्या पक्षाचे अस्तित्वच हे त्यावर अवलंबून आहे, त्यामुळे आज ना उद्या कुणाची सुपारी घ्यायची आहे’, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली आहे. मुंबईत पत्रकारांशी बोलत असताना अनिल परब यांनी वीज बिलाच्या मुद्यावरून मनसे आणि भाजपवर सडकून टीका केली आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

भाजप आणि मनसे एकाच मुद्यावर आंदोलन करत आहे. आता हे नवी समिकरणं आहे की नाही, हे माहीत नाही. पण त्यांना तर कुणाची ना कुणाची सुपारी घ्यावी लागते. त्यांच्या पक्षाचं अस्तित्वच त्याच्यावर आहे. ज्या भाजपच्या नेत्यांना मागच्या निवडणुकीत अगदी ठसठशीत ‘लाव रे तो व्हिडीओ करून उघडं नागडं केलं. आता नागड्या बरोबर उघडा झोपला तर काय परीस्थिती होते हे पुढे दिसेलच’ असा सणसणीत टोला परब यांनी लगावला.

वाचा :- बीड- अखेर बापानेच मुलाला स्वतःचे आतडे देऊन वाचविला जीव

‘कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे आतापर्यंत कोणत्याही मोर्चाला परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे मनसेच्या मोर्चाबद्दल काय निर्णय घ्यायचा आहे, तो घेतला जाईल’, असे संकेतही परब यांनी दिले.

वाचा :- लॉकडाऊनच्या दिशेने महाराष्ट्राचे पहिले पाऊल?

‘मुंबई महापालिका निवडणूक आहे. आम्ही येणाऱ्या निवडणुकींना सामोरे जाऊ आणि विश्वासाने निवडणुका जिकू’, असा विश्वासही परब यांनी व्यक्त केला. 7 डिसेंबरला सल्लागार समितीची बैठक आहे. त्यानंतर हिवाळी अधिवेशन घ्यायचं की पुढे ढकलायचं हे ठरवलं जाईल पण अधिवेशन मुंबईतच होईल, असा दावाही परब यांनी केला.

वाचा :- महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमीवर गर्दी नको- मुख्यमंत्री

वाचा :- CM ठाकरेंचा कडक इशारा! राज्यात पुन्हा लॉकडाऊनची वेळ आणू नका