महाराष्ट्र

अर्णब गोस्वामींचे अमृता फडणवीसांनी शायरी करत केले कौतुक

अर्णब गोस्वामींच्या अटकेमुळे भाजपचे नेते संतापले!

4 Nov :- वास्तुविशारद अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामी यांच्यावर झालेल्या पोलीस कारवाईचे तीव्र राजकीय पडसाद उमटत आहेत. भाजपच्या नेत्यांनी या मुद्द्यावरून ठाकरे सरकारला घेरलं आहे. राज्य सरकार आणीबाणीची मानसिकता घेऊन कारभार करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यानंतर आता अमृता फडणवीस यांनीही शायरी करत ट्वीट केलं आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

अलिबाग पोलिसांनी आज सकाळी अर्णब यांना वरळीतील त्यांच्या घरातून अटक केली. त्यांना सध्या अलिबागला नेण्यात आलं आहे. गोस्वामी यांच्यावर झालेल्या कारवाईचा भाजपकडून निषेध केला जात आहे. राज्य सरकार सूड भावनेनं वागत असल्याची टीका होत आहे.

वाचा:- राज्य सरकारचा मोठा निर्णय; उद्यापासून ‘हे’ सर्व सुरू होणार

वेगवेगळ्या मुद्द्यांवरून ठाकरे सरकारवर टीका करणाऱ्या अमृता फडणवीस यांनीही या पार्श्वभूमीवर ट्वीट केलं आहे. त्यांनी एक शेर ट्वीट केला आहे. त्यातून त्यांनी अर्णब यांचं कौतुक केलं आहे.

वाचा :-अभिनेता फराज खानचं वयाच्या अवघ्या 46व्या वर्षी निधन

‘बहुत छाले है उसके पाओं में,
कम्बख़्त उसूलों पे चला होगा!… असं अमृता फडणवीस यांनी शायरी करत आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. या माध्यमातून त्यांनी अर्णब यांची पाठराखण केली आहे. अर्णब गोस्वामी हे तत्वनिष्ठ आहेत. त्यामुळंच त्यांना सहन करावं लागत आहे,’ असं सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. सोबत #DeathofDemocracy असं हॅशटॅगही त्यांनी दिलं आहे.

वाचा:- ठाकरे सरकारची बदनामी करण्यासाठी ट्वीटरवर दीड लाख अकाउंट उघडले!

वाचा:- कोहली, गांगुली, राणा, तमन्नाला कोर्टानं बजावली नोटीस

वाचा:- 200 हून अधिक भाजप कार्यकर्त्यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश