महाराष्ट्र

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यानी दिला ‘हा’ सल्ला

माझं कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेतील झालेले काम कौतुकास्पद

18 Oct :- राज्यात कोरोना विषाणूचा कहर वाढत असला तरी रुग्ण बरे होण्याचे वाढते प्रमाण दिलासा देणारे. कोरोना विषाणूला थोपवण्यासाठी प्रभावी लस बनवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. कोरोना विरुद्धचा लढा आता निर्णायक वळणावर आला आहे. यावर लस प्राप्त होईपर्यंत कोरोना संसर्ग टाळण्यासाठी मास्कच उत्तम लस ठरणार आहे, याची जाण ठेवा आणि इतरांना जाणीव करुन द्या.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

कोरोनाची दुसरी लाट येवू द्यायची नाही. यासाठी MAH अर्थात मास्क, अंतर आणि हातांची स्वच्छता अशी शपथ सर्वांनी घ्यावी, असा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी रुग्णालयातील प्लाझ्मा थेरपीसाठीच्या अफेरेसिस युनिटच्या ऑनलाईन उद्घाटन प्रसंगी दिला. जिल्हा रुग्णालयात अशी व्यवस्था उपलब्ध झालेला रत्नागिरी हा राज्यातील पाहिला जिल्हा ठरला आहे.

वाचा :- ‘या’ महिन्यापर्यंत कोरोना येणार संपुष्टात!

कोकणला लाटांचा सामना कसा करायचा ते शिकवण्याची गरज नाही. पण कोरोनाबाबत दुसरी लाट न येवू देणे ही प्राथमिकता आहे. कोरोनामुक्त झालेली एक व्यक्ती एका महिन्यात दोन वेळा प्लाझ्मा दान करुन चार जणांचा जीव वाचवू शकते. त्यामुळे येणाऱ्या काळात मृत्यूदर देखील कमी होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

वाचा :- नुसते दौरे नको, शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करा

माझं कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेत रत्नागिरीत झालेले काम कौतुकास्पद आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की याच पध्दतीने आगामी काळात जाणीवर जागृती करुन कोरोनाचा घसरता आकडा आणखी कमी करा. युरोपप्रमाणे पुन्हा लॉकडाऊन की मास्क, सुरक्षित अंतर आणि हातांची स्वच्छता याबाबत प्रत्येकापर्यंत जागृती करा.

वाचा :- वेळ आल्यास घटना बदलण्यासाठीही माझा अभ्यास सुरु- संभाजीराजे

वाचा :- गॅस सिलेंडर घरपोहच मिळणार नाही; जाणून घ्या नवे निअम व अटी!