महाराष्ट्र

कोरोनाला थोपवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिला ‘हा’ मोलाचा सल्ला

करोनाला रोखणे सहज शक्य आहे- मुख्यमंत्री ठाकरे

11 Oct :- राज्यभरात कोरोना विषाणू धुमाकूळ घालत असला तरी देशभरातून सर्वाधिक कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या ही महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक असल्याने दिलासा मिळत आहे. आरोग्य प्रशासनाने दिवसरात्र घेतलेल्या मेहनतीमुळे राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्नांचे प्रामण वाढू लागले आहे. करोनावर मात करण्यासाठी काय खबरदारी घ्यावी, याबाबत विविध माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेच्या माध्यमातून घरोघरी जावून याबाबत माहिती देण्यात येत आहे. करोनाला हरविण्यासाठी मास्कचा वापर, हात स्वच्छ धुणे आणि शारीरिक अंतर राखणे या त्रिसूत्रीचा वापर करून आपल्या जीवनशैलीत बदल करणे आता आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री बाधितांसाठी मोठ्या प्रमाणात बेड्स उपलब्ध करून दिले आहेत. मात्र, त्याचा वापर करण्याची वेळ येऊ नये, अशी परिस्थिती निर्माण करणे आवश्यक आहे.

वाचा :- मुख्यमंत्री ठाकरेंना उच्च न्यायालयाची नोटीस

करोना विषाणू संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी शासकीय यंत्रणा दिवसरात्र मेहनत करीत आहे, याचा सार्थ अभिमानच आहे. मात्र त्यासोबत नागरिकांनीही करोनाला दूर ठेवण्यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे. आपल्या जीवनशैलीत काही प्रमाणात बदल केल्यास करोनाला रोखणे सहज शक्य आहे, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला. वाशिम येथील जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरातील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेचे (आरटी-पीसीआर) ई-लोकार्पण मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारकडून करोनाशी लढा देण्यासाठी कशी वेगाने यंत्रणा उभारण्यात आली त्याचा धावता आढावाही घेतला.

वाचा :- नागरिकांनो, जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर

मुख्यमंत्री म्हणाले, करोना संसर्गाला सुरुवात झाली तेव्हा राज्यात केवळ एक-दोनच विषाणू चाचणी प्रयोगशाळा होत्या. आता राज्यात प्रयोगशाळांची संख्या वाढविण्यात आली असून प्रत्येक जिल्ह्यात प्रयोगशाळेची उभारणी करण्यात येत आहे. त्यानुसार वाशिम येथे विषाणू चाचणी प्रयोगशाळा उभारणीची मागणी आज पूर्ण झाली. या प्रयोगशाळेचा पूर्ण क्षमतेने उपयोग करून चाचण्यांची संख्या वाढवावी. करोना बाधितांचा शोध घेण्यासाठी चाचणीची सुविधा, उपचार केंद्रांची संख्या वाढविली आहे. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेच्या माध्यमातून घरोघरी जावून लोकांची आरोग्य तपासणी करतो आहोत. त्यामुळे करोना संसर्गाचा आलेख कमी होण्यास मदत होईल.’

वाचा :- कोरोनाची सौम्य लक्षण दिसणाऱ्या रुग्णांनी ‘ही’ काळजी घ्या

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, ‘राज्यात ४०० पेक्षा अधिक विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा कार्यान्वित झाल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यात ह्या प्रयोगशाळा होत आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी या प्रयोगशाळेसाठी सातत्याने पाठपुरावा करून जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून दिला आहे. या प्रयोगशाळेमुळे चाचण्यांची गती आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढेल. जिल्ह्याचा करोना मृत्युदर हा केवळ १ टक्का आहे, ही चांगली बाब आहे. जिल्ह्यात करोना बाधितांसाठी उपलब्ध असलेल्या बेड्सच्या प्रमाणात फक्त ७ टक्के रुग्ण भरती आहेत, तर ९३ टक्के बेड्स रिकामे आहेत, हीसुद्धा समाधानाची बाब आहे.’

वाचा :- चीनचा दावा! आम्ही कोरोना पसरवला नाही

वाचा :- भारतात 60 लाख रुग्ण कोरोनामुक्त