भारत

भारतात 60 लाख रुग्ण कोरोनामुक्त

महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण कोरोनामुक्त

11 Oct :- देशात सर्वत्र कोरोना विषाणूचा कहर मोठ्या प्रमाणात सुरु असला तरी देशात कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्या दिलासादायक आहे. तर संपूर्ण देशात महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोनामुक्त होरणाऱ्यांची सर्वाधिक असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. कोरोना विषाणू सारख्या महाभयंकर रोगावर अद्याप कुठलेही औषध नाही. मात्र कोरोना विषाणूंवर सध्या तरी ‘खबरदारी’ हा एकमेव उपाय आहे. योग्य खबदारी घेतल्याने भारतामध्ये कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या जगभरात सर्वाधिक आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

देशात कोरोना संसर्गावर अद्याप नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं नाही. मात्र, दिलासा देणाऱ्या अनेक गोष्टी घडत आहे. कोरोनामुळे होणारा मृत्यूदर घटला असून रिकव्हरी रेट वाढला आहे. महत्वाचं म्हणजे देशात आतापर्यंत 60 लाख कोविड रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. सलग 8 दिवसांपासून 1000 पेक्षा कमी मृत्यूची नोंद होत आहे. बरे झालेले अर्ध्याहून अधिक रुग्ण पाच सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या राज्यातले आहेत. देशाने आज आणखी एक महत्वाचा टप्पा गाठला. देशात कोविडमधून बरे झालेल्यांची एकूण संख्या 60 लाखांहून अधिक (60,77,976 ) झाली आहे.

वाचा :- मुख्यमंत्री ठाकरेंना उच्च न्यायालयाची नोटीस

दररोज मोठ्या संख्येने कोविड रुग्ण बरे होत असून मोठ्या संख्येने रुग्ण बरे होण्याचा वेग कायम आहे. देशात गेल्या 24 तासात 89, 154 रुग्ण बरे झाले आहेत. देशभरात वैद्यकीय पायाभूत सुविधांमध्ये झालेली वाढ, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांद्वारे केंद्राच्या प्रमाणित उपचार प्रोटोकॉलची अंमलबजावणी आणि डॉक्टर, निमवैद्यकीय आणि आघाडीवर काम करणाऱ्यांची समर्पित वृत्ती तसेच वचनबद्धता यामुळे दैनंदिन मृत्यूच्या संख्येत सातत्याने घसरण झालेली पाहायला मिळत आहे. बरे होणाऱ्यांच्या संख्येत सातत्याने वाढ दिसून येत आहे.

वाचा :- नागरिकांनो, जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर

गेले सलग आठ दिवस नवीन मृत्यूची नोंद 1000 पेक्षा कमी नोंदवली गेली आहे. देशात गेल्या 24 तासात 918 मृत्यूंची नोंद झाली आहे. देशातली सक्रिय (अॅक्टीव) रुग्णांची संख्या 8,67,496 आहे. सक्रिय रुग्णांच्या संख्येतली घट कायम असून गेल्या तीन दिवसात ती 8 लाखांपेक्षा कमी आहे.

वाचा :- कोरोनाची सौम्य लक्षण दिसणाऱ्या रुग्णांनी ‘ही’ काळजी घ्या

कोविडमधून रुग्ण बरे होण्याचा (रिकव्हरी रेट) राष्ट्रीय दर आणखी वाढून तो 86.17 % झाला आहे. रुग्ण बरे होण्याच्या वाढत्या संख्येबरोबरच जगात सर्वाधिक संख्येने रुग्ण बरे होण्यातले अव्वल स्थान भारताने कायम राखले आहे. बरे झालेल्या रुग्णांपैकी अर्ध्याहून अधिक रुग्ण (54.%), सर्वाधिक रुग्णसंख्या (सक्रिय रुग्णांपैकी 61%) असलेल्या 5 राज्यांमधले आहेत.

वाचा :- चीनचा दावा! आम्ही कोरोना पसरवला नाही

बरे झालेल्या रुग्णांच्या नव्या नोंदींपैकी 80% हे महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, दिल्ली आणि चंदिगड या 10 राज्यांमधले आहेत. यात महाराष्ट्र अव्वल स्थानी असून काल (शनिवार) 26 हजारांहून अधिक रुग्ण बरे झाल्याची नोंद झाली. देशात गेल्या 24 तासात 74,383 नव्या रुग्णांची नोंद झाली.

वाचा :- संतापजनक! धावत्या कारमध्ये केला बलात्कार

नव्या रुग्णांपैकी 80% रुग्ण 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील आहे. केरळमध्ये सर्वाधिक नवे रुग्ण आढळले असून त्यापाठोपाठ महाराष्ट्राचा क्रमांक आहे. या दोन्ही राज्यांमध्ये 11,000 हून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली. गेल्या 24 तासात 918 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यापैकी 84% मृत्यू हे 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातले आहेत. एकूण मृत्यूंपैकी 33% मृत्यू महाराष्ट्रातले असून काल महाराष्ट्रात 308 मृत्यू झाले. त्यापाठोपाठ कर्नाटकमध्ये 102 मृत्यू झाले.

वाचा :- कंगनाच्या विरोधात एफआयआर दाखल