महाराष्ट्र

राजेश टोपेंच्या बैठकीदरम्यान शेतकऱ्याने केला आत्महत्येचा प्रयत्न

प्रशासनाची उडाली धांदल!

5 Oct :- कोरोना विषाणूचे वाढते थैमान दिवसेंदिवस मानवी जीवन विस्कळीत करत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे सर्व सामान्य नागरिकांना मोठ्या आर्थिक अडचनींना सामोरे जावे लागत आहे. रोज अर्थीक अडचणींशी दोन हात करत असताना नैराश्यास वैतागून मजबुरीने नागरिक जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न करू लागला आहे. आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे यांच्या आढावा बैठकीदरम्यान एका शेतकऱ्याने विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

विलास राठोड असं या शेतकऱ्याचा नाव असून तो सेवली शिवारातील पाथरूड गावाचा रहिवासी आहे. सावकाराने जमीन हडपली असून यासंदर्भात वारंवार तक्रारी करून देखील महसूल आणि पोलीस प्रशासन काहीच कारवाई करत नसल्याने संतप्त झालेल्या या शेतकऱ्याने आज जालना जिल्हाधिकारी कार्यालयात राजेश टोपे यांच्या उपस्थितीत होत असलेल्या आढावा बैठकीदरम्यान विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

वाचा :- पुन्हा कपिल शर्मा शो बंद पडण्याची शक्यता

अचानक घडलेल्या या घटनेमुळे अधिकाऱ्यांची एकच धांदल उडाली. सदर शेतकऱ्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून घटनेनंतर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस लावण्यात आला आहे.

वाचा :- खळबळजनक! भावाने केला बहिणीवर बलात्कार

दरम्यान, पालकमंत्री राजेश टोपे यांच्यासमोर घडलेल्या या प्रकारामुळे प्रशासनाची चांगलीच अडचण झाली आहे. त्यामुळे आगामी काळात या शेतकऱ्याने ज्या कारणासाठी आपला जीव देण्याचा प्रयत्न केला, त्याबाबत सदर शेतकऱ्याला न्याय मिळणार का, हे पाहावं लागेल.

वाचा :- धक्कादायक! पोलीस आयुक्तालयाजवळ गोळीबार

वाचा :- शरद पवारांनी टोचून घेतली करोनावरील लस?; नेमकं काय घडलं जाणून घ्या