सिनेमा,मनोरंजन

अभिषेक फाशी घेऊन लटकला असता तर…

कंगनाने जया बच्चन यांना दिलं प्रत्युत्तर!

15 Sept :- सुशांत सिंह राजपूत मृत्यु प्रकरणात ड्रग कनेक्शन समोर आल्यानंतर अनेकांनी यातून काढता पाय घेतला आहे. नुकतंच समाजवादी पार्टीच्या राज्यसभा खासदार आणि अभिनेत्री जया बच्चन या प्रकरणाबाबत संसदेत अशा काही बोलल्या की त्याची आता सगळीकडे चर्चा सुरु झाली असून पडसाद उमटायला लागले आहेत.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

राज्यसभेच्या पावसाळी अधिवेशनात दुस-या दिवशी जया बच्चन यांनी केंद्र सरकारला बॉलीवूडची सुरक्षा आणि समर्थन करण्याचं आवाहन केलं.सोबतंच त्यांनी रवि किशन यांच्यावर निशाणा साधला आणि म्हटलं की ‘कुछ लोग जिस खाली मै खाते हे उसी मे छेद करते है.’ आता जया बच्चन यांच्या या वाक्यावर अभिनेत्री कंगना रनौतने प्रत्युत्तर दिलं आहे.

वाचा :- ‘या’ महिन्यापासून चीन उपलब्ध करून देणार ‘कोरोना लस’

कंगनाने ट्विट करत जया यांची मुलं अभिषेक आणि श्वेताचं नाव यात ओढलं आहे. कंगनाने तिच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन म्हटलं आहे की, ‘जया जी माझ्या जागी जर तुमची मुलगी श्वेता असती आणि तिच्या तरुणपणात तिच्यासोबत मारझोड झाली असती, ड्रग्स देऊन तिचं शोषण केलं असतं तेव्हा पण तुम्ही असंच म्हणाला असतात का? जर अभिषेक सतत छळ आणि शोषणबद्दल बोलता असता आणि एक दिवशी फाशी घेऊन लटकला असता तेव्हा देखील तुम्ही असंच म्हटलं असतं का? थोडी सहानुभुती आमच्याप्रती देखील दाखवा.’कंगनाने जया बच्चन यांना दिलेलं हे प्रत्युत्तर सोशल मिडियावर व्हायरल होतंय. तसंच यावर अनेकजण स्वतःच्या प्रतिक्रिया देत कंगनाच्या बोलण्याचं समर्थन करताना दिसतायेत.

वाचा :- नेहरूंनी केलेल्या ‘त्या’ चुकीची पुनरावृत्ती मोदी करतायेत