सिनेमा,मनोरंजन

‘या’ कारणामुळे अंजली भाभी केला अलविदा!

29 Aug :- गेल्या १२ वर्षांपासून घरा घरांमध्ये दिवस पाहण्यात येणारी विनोदी लोकप्रिय असणारी मालिका तारक मेहता का उलटा चष्मा प्रेक्षकांच्या मानवर अधिराज्य करून आहे.लहानांपासून ते थोरांपर्यंत पॉट धरून खळखळून हसवणारी ही मालिका प्रेक्षक आवर्जून पाहतातच.विनोदा बरोबर समाजाला अनेक सुज्ञ शिकवणी देखील या मालिकांच्या माध्यमातून दिल्या जातात.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

या मालिकेतील प्रत्येक पात्र हे घरा घरांमध्ये लोकप्रिय आहे. मात्र या मालिकेतील महत्वपूर्ण अंजली भाभीची भूमिका साकारणारी अभिनेत्री नेहा मेहताने अचानक तारक मेहता का उलटा चष्मा मालिका सोडल्यामुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड निराश निर्माण झाली आहे. एक नवीन प्रोडजेक्ट भेटला असे कारण सांगून मालिका सोडणारी अभिनेत्री नेहा मेहताने मालिका सोडण्याचं कारण समोर आले आहे.

हे वाचा :- शाळा सुरू करण्याबाबत घेतला मोठा निर्णय!

एका मनोरंजनविषयक वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत नेहाने यामागचं खरं कारण अप्रत्यक्षपणे सांगितलं आहे. “कभी कभी खामोशी बोलती है”, असं नेहाने या मुलाखतीत सांगितलं.तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेत नेहा गेली 12 वर्षं काम करत होती. Coronavirus चा लॉकडाऊन संपल्यानंतर मालिकेचं चित्रिकरण पुन्हा सुरू झालं, तेव्हा मात्र नेहाने मालिका सोडल्याच्या बातम्या आल्या. त्यामागे कोविडचा धोका हे कारण देण्यात आलं असलं, तरी प्रत्यक्षात प्रॉडक्शन हाऊसबरोबर उडालेले खटके हे खरं कारण असल्याचं आता बोललं जात आहे.

हे वाचा :- Unlock-4; ‘हे’ नवे नियम जाहीर होण्याची शक्यता

पिंकव्हिला या वेबसाईटशी बोलताना नेहा मेहता म्हणाली, ‘असित मोदी यांच्याबद्दल मला आदर आहे. माझा देवावर विश्वास आहे, म्हणून हे मी बोलते आहे… कधी कधी गप्प बसून तुम्ही खूप काही सांगू शकता. मला एक चांगलं आयुष्य जगायचं आहे. माझ्या चाहत्यांसाठी चांगलं काम करत राहणार. शेवटी प्रत्येक गोष्टीचा अंत काहीतरी चांगल्याची सुरुवात घेऊनच येतो.’

हे वाचा :- ‘ही’ अभिनेत्री साकारणार आंजली भाभीची भूमिका!

नेहा मेहताच्या या वक्तव्यामागे प्रॉडक्शन हाउसबरोबरचे वाद असल्याचं आता सांगितलं जात आहे. काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, फेब्रुवारीमध्ये नेहाने प्रॉडक्शन हाऊससमो काही प्रश्न मांडले होते. पण नेहाचे मुद्दे विचारात घेतले गेले नाहीत. लॉकडाऊननंतर पुन्हा शूटिंग सुरू झालं, तेव्हाही नेहाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यात आलं. त्यामुळे वैतागून नेहाने मालिकेला अलविदा केलं, असं मनोरंजन क्षेत्रातल्या काही वेबसाईट्सनी दिलेलं वृत्त आहे.

हे वाचा :- मोठा दिलासा; मोदी सरकारने ‘या’ वस्तूंवरील घटवला GST!