बीड

‘या’ कारणामुळे दोन्ही भावांनी घेतला गळफास!

 26 Aug :- राजधानी दिल्लीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील चांदनी चौकातील राहणाऱ्या ज्वेलरी व्यवसायातील दोन भावानी गळफास लावून आत्महत्या केली आहे. 

आत्महत्येचे कारण आर्थिक चणचण असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीतील चांदनी चौकातील मालीवाडामध्ये हल्दीरामच्या वरच्या मजल्यावर कृष्णा ज्वेलर्स नावाचे आदिश्वर गुप्ता यांचं दुकान आहे. त्यांची दोन मुलं अंकित गुप्ता (47), आणि अर्पित गुप्ता (42) याच दुकानातून काम करीत होते. बुधवारी दोन्ही भाऊ दुकानात होते. साधारण 3 वाजता दोन्ही भावांनी दुकानात गळफास घेऊन आत्महत्या केली.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

घटनेची माहिती मिळताच संपूर्ण बाजारात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होताच भावांचा मृतदेह खाली उतरवला आणि पंचनाम्याच्या कारवाईनंतर दोघांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आला. सांगितले जात आहे की दोन्ही भावांना व्यवसायात मोठं नुकसान झालं होतं. दोघेही कर्जात बुडाले होते.

हे वाचा :- शाळा,कॉलेज सुरू करणं पडलं महागात!

यामुळे त्रस्त होत दोघांनी आत्महत्येचं पाऊल उचललं. दोघांनी दुकानात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबीयांचा मोठा धक्का बसला आहे. त्यांच्याजवळ मिळालेल्या सुसाईट नोटमधून त्यांच्या आत्महत्येचं कारण समोर आलं आहे.कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांवर आर्थिक संकट कोसळलं आहे. गेल्या तीन ते चार महिन्यात अनेकांना अशा स्वरुपाच घातक पाऊल उचलल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.

हे वाचा :- हिवाळ्यात कोरोना होणार आणखी गंभीर; जागतिक आरोग्य तज्ज्ञांचा विश्वास