राजकारण

सुशांतच्या वडिलांवर संजय राऊतांचा घनघाती आरोप!

हिंदी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय आघाडीचा अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने नैराश्यास वैतागून अचानक गळफास घेऊन आत्महत्या केली. महिन्यांचा कालावधी लोटतो आहे,मात्र अजूनही पोलिसांना सुशांतच्या आत्महत्येचं कारण स्पष्ट झालेले नाही. बॉलीवूड मधील अनेक चित्रपट निर्माते,दिग्दर्शक,अभिनेते यांची पोलिसांनी चोकशी केली आहे.मात्र आणखीनही सुशांत आत्महत्येचा सुगावा पोलिसांना लावता आला नाही.

सीबीआयने सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरण चांगलचं तापलं आहे. सीबीआयने सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी तपास सुरु केला आहे.याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. संजय राऊत यांनी दावा केला आहे की, सुशांत सिंह राजपूत आणि त्याचे वडिल के. के. सिंह यांच्यातील नातं फारसं चांगलं नव्हतं. संजय राऊत यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रात प्रकाशिक केलेल्या लेखातून हा दावा केला आहे. परंतु, सुशांतच्या कुटंबियांनी संजय राऊत यांनी केलेल्या सर्व आरोपांचं खंडन केलं आहे.

संजय राऊत यांनी दावा केला आहे की, सुशांत आपल्या वडिलांच्या दुसऱ्या लग्नामुळे खूश नव्हता. संजय राऊत यांनी याप्रकरणी प्रश्न उपस्थित केला आहे की, ‘सुशांत सिंह राजपूत किती वेळा आपल्या वडिलांची भेट घेण्यासाठी पाटण्याला गेला होता?’ पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येमागील सत्य बाहेर येऊ नये म्हणून यावर राजकारण करण्यात आलं आणि मुंबई पोलिसांकडून हे प्रकरण काढून घेण्यात आलं. दरम्यान, के. के. सिंह यांच्या कुटुंबियांनी हे सर्व आरोप खोटे असल्याचं सांगितलं आहे.

संजय राऊत यांच्या आरोपांचं खंडन करताना, ते धादांत खोटं बोलत असल्याचं सुशांतचे मामा आर. सी. सिंह यांनी म्हटलं आहे.सुशांतचे कुटुंबिय याप्रकरणी बोलताना म्हणाले की, ‘संजय राऊत खोटं बोलत आहेत. सुशांतच्या वडिलांचं एकच लग्न झालं आहे, त्यानी दुसरं लग्न केलंच नाही. सर्व चुकीच्या गोष्टींना लपवण्यासाठी चुकीचे आरोप केले जात आहेत.’