भारत

कोरोना लस घरा-घरात पोहचवण्याबाबत मोदी सरकारचा प्लॅन!

कोरोना विषाणूने भारतातील मानवी आयुष्य विस्कळीत करून ठेवले आहे.देशभरात अनेक लोकांना कोरोनाची बाधा झाल्याने मृत्यूला देखी कवठाळा लागले आहे. देशभरातील अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडण्यात कोरोना विषाणू यशस्वी ठरला आहे.या कोरोना विषाणूंवर मात करण्याकरिता जगभरात प्रभावी लस तयार करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे.काही देशांनी कोरोनावर मात करण्याकरिता तयार केलेली प्रभावी लशीची मानवी चाचणी सुद्धा केली आहे.तर जग भरातून एकूण तब्ब्ल सध्या 165 कोरोना लशींवर काम सुरू आहे. त्यापैकी 26 लशींचं क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. तर सहा लशी क्लिनिकल ट्रायलच्या तिसऱ्या टप्प्यात आहेत.अशावेळी कोरोना लस बाजारात कधी उपलब्ध होणार आणि प्रत्येक घरा-घरात नागरिकापर्यंत ती कशी पोहोचणार यासाठी केंद्र सरकार आणि आरोग्य विभागाच्या बैठका होत आहेत.

कोरोनावरची लस भारतात उपलब्ध व्हावी यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील आहे. ही लस प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार योजना तयार करत आहे.इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार यावेळी भारत सरकारकडून वेगवेगळ्या योजना आखण्याचं काम सुरू आहे. याशिवाय वैज्ञानिक, शास्त्रज्ञ, विविध संस्थांचे अधिकारी यांच्यासोबत बैठक सुरू आहे. ही लस कशी प्रत्येक भागात आणि घरात पोहोचवता येईल यासंदर्भात विविध स्तरावर चर्चा सुरू आहे.सरकारनं दोन कमिटी स्थापन केल्या आहेत.

पहिल्या कमिटीमध्ये पंतप्रधान आणि वैज्ञानिक सल्लागार डॉक्टर के. विजयराघवन आहेत. हे कोरोनाच्या लशीच्या चाचणीवर लक्ष ठेवून आहेत. भारतात आणि जगभरात होणाऱ्या लशीच्या चाचण्यांवर त्यांचं लक्ष आहे.लस तयार झाल्यानंतर लोकांना लस कशी उपलब्ध करून द्यावी याबाबत काम सुरू आहे. कोणत्या प्रकारचे कोल्ड स्टोरेज ठेवले पाहिजे. उदाहरणार्थ, अमेरिकेतील मॉडर्ना लस उणे 70 अंश सेल्सिअस ठेवणे आवश्यक आहे, परंतु ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेका आणि भारत बायोटेकमध्ये असे नाही. या व्यतिरिक्त ही समिती प्रथम लसीचा डोस कोणाकडून दिला जाईल यावरही विचार करत आहे.