महाराष्ट्र

राज्यात भेटली अनेकांना कोरोनमुक्तीची पावती;मृत्यू संख्या उच्चांकी!

7 Aug :- राज्यात कोरोना विषाणूचे वाढते संक्रमण चिंताजनक जरी असले तरी सध्य परिस्थितीमध्ये कोरोनाबाधित रुग्ण संख्येपेक्षा रुग्ण बरे होण्याच्या आकडेवारीमध्ये वाढ होत असल्याचे सुखदायी चित्र समोर येत आहे.आज राज्यात तब्बल 10 हजार 900 रुग्णांना कोरोनमुक्तीची पावती देऊन घरी सोडण्यात आले आहे.

राज्यात आज एकूण 10 हजार 300 नवे रुग्ण आढळून आले आहेत.मात्र आज राज्यात मृत्यू संख्येत धक्कादायक वाढ झाल्याने सर्वांची खळबळ उडाली आहे.राज्यात आज दिवसभरात तब्बल 300 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. एका दिवसांमध्ये झालेली ही सर्वाधिक मृत्यूची नोंद आहे.राज्यात एकूण रुग्णांची संख्या ही 4 लाख 90 हजार 262 एवढी झाली आहे.1 लाख 45 हजार 582 रुग्ण Active आहेत. तर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 66.67 वर गेलं आहे.