भारत

झोपेत असताना साप चावल्याने ३ भावांचा मृत्यु!

7 Aug :- साप हे नाव जरी समोर आले तरी मोठ्यात मोठी बाप माणसं सुद्धा भयभीत होऊन सुन्न पडतात. सर्वांमध्येच सापाची मोठी दहशत दहशद असतेच. आणि गाढ झोपेत असताना सापाचं डसन म्हणजे नक्कीच मृत्यु झाला हा साधा समज आहे.अशीच एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील सीतापूर परिसरात घडली आहे.या घटनेमुळे नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.झोपेत असताना अचानक घरात साप घुसला आणि मोठा अनर्थ घडला. सापानं दंश केल्यानं तीन भावांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मनिकापूर गावात सुनील यांची तीन मुलं आपल्या घरात रात्रीच्या सुमारास जमिनीवर झोपले होते. अचानक आईला रात्री जाग आल्यावर उठून पाहिलं तर तिन्ही मूलं विचित्र अवस्थेत पडलेली होती. त्यांची अवस्था पाहून आईनं टाहो फोडला आणि तातडीनं शेजाऱ्यांना माहिती दिली.सापाचं विष शरीरात भिनल्यामुळे मुलं बेशुद्ध झाली होती. त्यांना तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. जिल्हा रुग्णालयात पोहोचण्याआधीच या मुलांचा मृत्यू झाला.

शरीरात जास्त प्रमाणात विष पसरल्यानं तातडीनं उपचार मिळणं गरजेचं होतं. परंतु जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याआधीच तीन मुलांनी प्राण सोडले. सापनं दंश केल्यानं या तीन मुलांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे.या प्रकरणी पोलिसांनी तीनही मुलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील तपास केला जाणार आहे. मुलांच्या अचानक जाण्यानं सुनील आणि त्यांच्या पत्नीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.