News

एक ऑगस्टपासून झालेत हे बदल; जाणून घ्या नाही तर लागेल खिशाला कात्री!

नवी दिल्ली: एक ऑगस्टपासून दैनंदिन व्यवहारातील अनेक गोष्टींच्या नियमांमध्ये बदल झाला आहे. यातील काही नियमातील बदल जाणून घेतले नाही तर त्याचा परिणाम थेट तुमच्या खिशावर होऊ शकतो. तर काही कामांची पूर्तता करण्यासाठी सरकारने ऑगस्ट महिना ही अंतिम मुदत दिली आहे. नवे निमय काय आहेत ते जाणून घेणे गरजेचे आहे. जर हे नियम समजून घेतले नाही आणि संबंधित कामे केली नाही तर आर्थिक फटका बसू शकतो.

ऑगस्ट महिन्यातील आनंदाची बातमी म्हणजे, एक तारखेपासून कार आणि बाइक संबंधित विम्याचे नियम बदलले आहेत. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणने यासंदर्भात नोटिफिकेशन जारी केले होते. नव्या नियमानुसार गाडीच्या विम्यासाठी लागणाऱ्या मोठ्या हप्त्यापासून सुटका झाली आहे. नव्या नियमानुसार १ ऑगस्ट २०२० पासून नवी गाडी (दुचाकी अथवा चार चाकी) साठी घेतला जाणारा थर्ड पार्टी आणि Own damage जो तीन वर्ष किंवा पाच वर्षासाठी घ्यावा लागत होता तो घेण्याची गरज नाही.

बँकेतील खात्यातील किमान रक्कमेबाबत (मिनिमम बॅलेंस) एक ऑगस्टपासून नियम बदलले आहेत. अॅक्सेस बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, कोटक महिंद्रा बँक, आरबीएल बँक यांनी एक ऑगस्टपासून नियमात बदल केले आहेत. यातील काही बँका कॅश काढण्यावर आणि जमा करण्यावर शुल्क आकारणार आहेत. तर काही जम किमान रक्कमेची मर्यादा वाढवणार आहेत. खात्यातील किमान रक्कम म्हणजे तुम्हाला संबंधित रक्कम खात्यात ठेवावी लागते. जर ती ठेवली गेली नाही तर दंड आकारला जातो.

ऑगस्ट महिन्यात शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एक ऑगस्टपासून पीएम किसान योजनाचा दुसरे अनुदान जमा केला जाणार आहे. पीएम किसान सन्मान निधी ज्याला पीएम किसान योजना असे देखील म्हणतात. या योजनेनुसार देशातील नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात एक वर्षात दोन हजार या हिशोबाने सह हजार रुपये जमा केले जातात. २०२० मधील पहिला रक्कम एप्रिल महिन्यात देण्यात आली होती. आता दुसरी रक्कम दिला जाणार आहे. सरकारने या योजनेच्या सुरुवातीपासून आतापर्यंत ९.८५ कोटी शेतकऱ्यांना रोख रक्कम दिली आहे. योजनेचा लाभ थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचवला जात आहे.

देशात काम करणाऱ्या इ कॉमर्स कंपन्यांसठी एक ऑगस्टपासून नवे नियम लागू झाले आहेत. आता या कंपन्यांना ते विकत असलेल्या वस्तू कोणत्या देशात तयार केल्या जातात याची माहिती द्यावी लागले. भारतातील ग्राहकांना विकाव्या लागणाऱ्या वस्तू आणि सेवांवर त्याची निर्मिती कोणत्या देशात झाली याचा उल्लेख करावा लागेल. हा नियम इलेक्ट्रॉनिक विक्रेत्यांना देखील लागू आहे. त्याच बरोबर संबंधित वस्तूवर शुक्लासह अन्य तपशील देखील द्यावा लागले. वस्तूची एक्सपायरी तारखेचा उल्लेख करावा लागेल.

RBL काही दिवसांपूर्वी बचत खात्यातील व्याज दरात बदल केले होते. आता बँकेचे डेबिट कार्ड हरवले तर नव्या कार्डसाठी २०० रुपये, कार्ड खराब झाले तर १०० रुपये द्यावे लागणार आहेत. तसेच डेबिट कार्डसाठी वर्षाला २५० रुपये द्यावे लागतील. याशिवाय मेट्रो, अर्बन, सेमी-अर्बन आणि ग्रामीण भागातील ग्राहकांना एका महिन्याला फक्त पाच मोफत व्यवहार ATMमधून करता येतील. हे सर्व चार्जेस GST वगळून आहेत.

आर्थिक वर्ष २०१८-१९ साठी आयकर रिटर्न दाखल करण्याची अंतिम मुदत पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. आता ही मुदत ३१ ऑगस्ट २०२० असणार आहे. यासोबतच २०१९-२० साठी ८० सी (LIC, PPF, NSC), ८० डी (मेडिक्लेम), ८० जी (दान) नुसार इनकम टॅक्समध्ये कपातीसाठीचा दावा करण्याची मुदत ३१ ऑगस्ट २०२० आहे. ऑगस्ट महिन्यात ही कामे करूनन घ्यावी लागती. सरकारने आतापर्यंत रिटर्न दाखल करण्यासाठी तीन वेळा मुदत वाढ दिली आहे. त्यामुळे जर तुम्ही आयकर रिटर्न दाखल केले नसेल तर हे काम पूर्ण करून घ्या.