भारत

सुखद! देशातल्या फक्त 0.28 टक्के पेशंटलाच व्हेंटिलेटर्सची गरज

31 July :- जगभरात सर्वत्र कोरोनाचे थैमान सुरु आहे.जगभरातल्या अनेक देशांना कोरोना विषाणूने वेठीस आणले आहे.भारतातही कोरोनाचा उद्रेक सुरु आहे मात्र देशात कोरोना विषाणूचा प्रसार वेगाने होत असला तरीही दिलासादायक बाब म्हणजे भारतात मृत्यूदर वाढलेला नाही.केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेत कोरोनाबाधित मृत्यू सर्वांत कमी झाले आहेत.केंद्रीय आरोग्यंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज कोविड-19 (Covid-19) वर असलेल्या मंत्रिगटाची बैठक घेत आढावा घेतला.

देशात दररोज रुग्णांची संख्या वाढत असली तरी परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेलेली नाही. हाती आलेली आकडेवारी दिलासा देणारी आहे असंही त्यांनी सांगितलं.देशात आत्तापर्यंत 10 लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत. देशासाठी ही दिलासा देणारी गोष्ट असल्याची माहितीही त्यांनी दिली.देशाचा रिकव्हरी रेट हा 64.5 टक्के असून पॉझिटिव्ह रुग्णांचं प्रमाण हे 33.27 टक्के असल्याची माहितीही त्यांनी दिली.भारतातला मृत्यू दर हा कमी असून तो सध्या 2.18 टक्के एवढा आहे.

जगात हा दर सर्वात कमी असल्याचं डॉक्टर हर्षवर्धन यांनी सांगितलं.देशातल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये केवळ 0.28 टक्के रुग्णच हे व्हेंटिलेटर्सवर आहेत.देशात 1.61 रुग्णांना ICU ची गरज आहे. तर 2.32 टक्के रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता. ही संख्या आटोक्यात राहावी असा सरकारचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं.देशातल्या राज्यांना आत्तापर्यंत 268.25 लाख N 95 मास्क, 120.40 लाख पीपीई किट आणि 1083.77 लाख HCQच्या गोळ्यांचा पुरवढा केल्या गेल्याची माहितीही त्यांनी दिली.