भारत

भारतात कोरोना बेअसर;सर्वांत कमी मृत्यू भारतात!

30 July :- जगभरात सर्वत्र कोरोनाचे थैमान सुरु आहे.जगभरातल्या अनेक देशांना कोरोना विषाणूने वेठीस आणले आहे.भारतातही कोरोनाचा उद्रेक सुरु आहे मात्र देशात कोरोना विषाणूचा प्रसार वेगाने होत असला तरीही दिलासादायक बाब म्हणजे भारतात मृत्यूदर वाढलेला नाही.केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेत कोरोनाबाधित मृत्यू सर्वांत कमी झाले आहेत.

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या देशात 10 लाखांहून अधिक झाली.सध्या भारतात 5 लाख 28 हजार अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. आणि बरे होणाऱ्या रुग्णांचा दर अॅक्टिव्ह पेशंटपेक्षा जवळपास दुप्पट आहे.रुग्ण पॉझिटिव्ह यायचं प्रमाण10 टक्क्यांहून कमी राखण्यात यश आलं आहे. ते 5 टक्क्यांवर आणायचं उद्दिष्ट आहे.जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाचं थैमान चिंताजनक असून इतरत देशांमध्ये कोरोनाबाधितांचे मृत्यूचे प्रमाण जास्त आहे.