महाराष्ट्र

राज्यात पहिल्यांदाच रुग्णवाढीपेक्षा रुग्ण बरे होण्याची संख्या जास्त!

27 JULY :- राज्यात कोरोना विषाणूच्या हाहाकाराने प्रशासनासह नागरिकांमध्ये सुद्धा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.दिवसेंदिवस वाढत्या कोरोनाबाधित रुग्णाच्या आकडेवारीमुळे राज्यावरील मोठ्या संकटाचे ढग स्पष्ट दिसू लागले आहेत.दरम्यान आज आलेल्या सुखद माहितीनुसार राज्यातील नागरिक आणि प्रशासनाला नक्कीच मोठा दिलासा मिळाला आहे.राज्यात आज पहिल्यांदाच रुग्णवाढीची संख्या कमी आणि रुग्ण बरे होण्याची संख्या वाढली आहे.

राज्यात गेल्या 24 तासांमध्ये 7924 नवे रुग्ण आढळून आलेत.तर आज 8706 रुग्णांना कोरोनमुक्तीची पावती मिळाली आहे.राज्याची पहिल्यांदाच अशी सुखद आणि दिलासादायक आकडेवारी समोर आली आहे.227 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातल्या कोरोना बाधितांची एकूण संख्या 383723 एवढी झाली आहे. तर आत्तापर्यंत 13883 जणांचा मृत्यू झाला आहे.
घाबरू नका…काळजी घ्या…गर्दी टाळा…मास्क वापरा…प्रशासनाच्या सूचनेचं पालन करा!