महाराष्ट्र

प्रकाश आंबेडकरांची आक्रमक भूमिका!

27 July :- राज्यात सर्वत्र कोरोना विषाणूचे थैमान सुरु आहे.कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे राज्यात अनेक ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आले आहे.मात्र लॉकडाऊनमुळे राज्यात निर्माण होणारी परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे.या मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

‘आमचा पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत, फक्त आम्हाला लॉकडाऊन मोडावं लागेल,’ असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.गुन्हे दाखल होण्याची भीती मला दाखवायची नाही, माझी जेलमध्ये जाऊन राहायची तयारी आहे. मी स्वतः कोविडची टेस्ट करून घेतली आहे, महाराष्ट्राचे ‘मुख्यमंत्री यांना माझी मागणी आहे की, आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य आणि सर्व लोक प्रतिनिधींची कोविड टेस्ट करून घ्यावी. ज्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे त्यांना शासनाने क्वारन्टाइन करावं, ज्यांची निगेटिव्ह आली त्यांना फिरायला रान मोकळं करावं,’ असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.