भारत

रतन टाटांनी व्यक्त केली तीव्र नाराजी!

25 July :- कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस चिंतेचं वातावरण निर्माण करत आहे.कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे मुक्त संचार करणे कठीण होत असल्याने सर्व सामान्य माणसांच्या हाताला काम भेटणे कठीण झाले आहे.नागरिकांच्या हाताला काम नसल्याने नाकरिकांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.आशा भयाण परिस्थितीमध्ये देशाची आर्थिक उलाढाल कमी होऊ लागली आहे.कोरोनामुळे लॉकडाऊन आणि बऱ्याच गोष्टी बंद आहेत.

बऱ्याच कंपन्यांनी,संस्थांनी कामगारांना,मजुरांना कामावरून निलंबित केले आहे.कामगारांचा पगार बंद केला आहे.याच पार्श्वभूमीवर टाटा ट्रस्टचे चेअरमन तथा उद्योगपती रतन टाटा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.कठीण काळात कंपन्यांवर कर्मचाऱ्यांची जबाबदारी असते. संकटाच्या काळात आपण आपल्या कर्मचार्‍यांशी असे वागता, हीच तुमची नैतिकता आहे का? असा सवालही त्यांनी केला आहे.

टाटा म्हणाले की, ही तिच लोकं आहेत, ज्यांनी तुमच्यासाठी काम केलंय, तुमच्यासाठी कारकीर्द देणाऱ्या या लोकांना तुम्ही आज उघड्यावर सोडून देत आहात, ही तुमच्या नितीमत्तेची व्याख्या आहे का? असं रतन टाटा यांनी म्हटलं आहे.उद्योजक आणि कंपन्यांसाठी दीर्घकाळ काम करणे आणि उत्तम कामगिरी करण्यासाठी कर्मचाऱ्यांची संवेदनशीलता सर्वोपरी असते. साथीच्या काळात तुम्ही तुमच्या कर्मचार्‍यांशी असे वागता, ही तुमची नैतिकता आहे का? असा सवाल त्यांनी युवरस्टोरीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

जेव्हा देशात विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला तेव्हा हजारो लोकांना काढून टाकण्यात आले. यामुळे तुमच्या समस्येचे निराकरण होईल का? मला नाही वाटत की असे होईल, कारण तुम्हाला व्यवसायात नुकसान झाले आहे, अशात लोकांना नोकरीवरून काढणे योग्य नाही. उलट त्या लोकांबद्दल आपली जबाबदारी असते, असं ते म्हणाले.तुम्ही या वातावरणात तोपर्यंत टिकणार नाहीत, जोपर्यंत तुम्ही संवेदनशील होत नाहीत. तुम्हाला लपण्यासाठी किंवा पळण्यासाठी कोणतीही जागा नाही. तुम्ही जेथे जाल तिथे कोरोना महामारीमुळे नुकसान होईल. यामुळे तुम्ही परिस्थिती स्वीकारणे चांगले राहील. तुमच्यामुळे जे काही होईल, त्या गोष्टींमध्ये बदल करावा लागेल, असंही रतन टाटा म्हणाले.