बीड

Coronavirus: दिवसभरात ५ हजार रुग्ण करोनामुक्त; २७८ दगावले

मुंबईः राज्यात करोनाचा वाढता आकडा आता चिंता वाढवणारा ठरत आहे. तर एकीकडे करोनामुक्त होणाचे प्रमाणही वाढत आहे. आज राज्यात तब्बल ५ हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. तर राज्यातील करोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या २ लाखांच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.९९ टक्के इतके आहे. अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

आज राज्यात ९ हजार ६१५ नवीन रुग्णांची नोंद झाल्यानं एकूण रुग्णसंख्या ३ लाख ५७ हजार ११७ झाली आहे. तर आज २७८ जण करोनामुळं दगावले आहेत. त्यामुळं एकूण करोना मृतांचा आकडा आता १३ हजार १३२वर पोहोचला आहे. राज्यातील मृत्यू दर ३. ६८ टक्के इतका झाला आहे. आज तपासण्यात आलेल्या १७ लाख ८७ हजार ३०६ चाचण्यांपैकी ३ लाख ५७ हजार ११७ (१९.९८%) अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर बाकीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आज राज्यात ५ हजार ७१४ रुग्ण एकाचवेळी बरे झाल्यानं दिलासा मिळाला आहे. तर आत्तापर्यंत १ लाख ९९ हजार ९६७ करोना रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर सध्या विविध रुग्णालयांत १ लाख ४३ हजार ७१४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. सध्या राज्यात ८ लाख ८८ हजार ९७६ जण होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर, ४५ हजार ८३८ जणं संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

राज्यात नोंद झालेले २७८ मृत्यू हे मुंबई मनपा-५४, ठाणे-४, ठाणे मनपा-७, नवी मुंबई मनपा-१०,कल्याण-डोंबिवली मनपा-१३, उल्हासनगर मनपा-४, भिवंडी निजामपूर मनपा-२, मीरा-भाईंदर मनपा-१६, वसई-विरार मनपा-४, पालघर-२,रायगड-१०, पनवेल मनपा-४, नाशिक-१, नाशिक मनपा-१०, अहमदनगर-२, अहमदनगर मनपा-१, धुळे- १, जळगाव-९, जळगाव मनपा-१, नंदूरबार-१, पुणे-८, पुणे मनपा-४९, पिंपरी-चिंचवड मनपा-१७, सोलापूर-५, सोलापूर मनपा-४, सातारा-३, कोल्हापूर-४, कोल्हापूर मनपा-३, रत्नागिरी-२, औरंगाबाद-१, औरंगाबाद मनपा-४, जालना-३, हिंगोली-१, परभणी-२, परभणी मनपा-१, लातूर मनपा-२, उस्मानाबाद-३, बीड-२, नांदेड-३, नांदेड मनपा-१, यवतमाळ-१,नागपूर मनपा-२ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील तर इतर राज्य १ अशी नोंद आहे.