राजकारण

गांधी यांनी पुन्हा साधला पंतप्रधानावर निशाणा

23 July :- कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी चीनविरोधात लढण्यासाठी पंतप्रधानांजवळ कुठलीही रुपरेषा नाही त्यामुळंच चीन आपल्या हद्दीत घुसला, असा आरोप केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पूर्ण फोकस आपली इमेज बनवण्यावर आहे. सर्व संस्था त्याच कामात गुंतल्या आहेत. केवळ कुण्या एका व्यक्तिची प्रतिमा बनवनं म्हणजे राष्ट्राची प्रतिमा होऊ शकत नाही, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.


राहुल गांधी म्हणाले की, मोठ्या स्तरावर विचार करूनच भारताचं रक्षण केलं जाऊ शकतं. चीनबरोबर सीमा वाद आहे आणि आपण तो सोडविला पाहिजे, पण आपला मार्ग बदलला पाहिजे. आपली विचारसरणी बदलली पाहिजे. आम्ही दोन डगरीवर उभे आहोत. जर आपण एका बाजूला गेलो तर आपल्याला यश मिळेल आणि दुसरीकडे गेलो तर विसंगत होऊन जाऊ, असं ते म्हणाले