महाराष्ट्र

सुखद;राज्यात रुग्ण बरे होण्याचा वेग वाढला!

21 July :- राज्यात कोरोनाबाधित रुग्णाची झपाट्याने वाढणारी संख्या चिंतेचा विषय असला तरी गेल्या २४ तासांत रुग्ण बरे होण्याचा वेग वाढला आहे. राज्यात आज अनेक रुग्णांना कोरोनमुक्तीची पावती भेटली असून आज 7188 रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे.

कोरोना विषाणूच्या जाळ्यातून मुक्त होणाऱ्या रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रशासनाला दिलासा मिळाला असून राजयोतील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.मात्र या सुखद माहिती बरोबर धक्कादायक माहिती अशी आहे की गेल्या 24 तासांत 8369 नव्या Covid रुग्णांचं निदान झालं आहे, तर 246 जणांना मृत्यू नोंदवण्यात आला आहे. राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 3 लाख 27 हजार 31 एवढी झाली आहे.

राज्याचा मृत्युदर देखील कमी झुलूंची सुखद माहिती आज समोर आली आहे.मृत्यूचा आकडा 12,276 वर गेला आहे.तर 246 जणांना मृत्यू नोंदवण्यात आला आहे.
काळजी घ्या…गर्दी टाळा…मास्क वापरा…सोशल डिस्टन्स ठेवा…प्रशासनाच्या सूचनेचं पालन करा!