सिनेमा,मनोरंजन

कंगनाचा आरोप! तू आता संपलीस म्हणून धमकावलं होतं

18 July :- सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर Nepotism आणि चित्रपटसृष्टीतल्या एकाधिकारशाहीबद्दल सडेतोड बोलणाऱ्या कंंगना रानौटने आज एका मुलाखतीत आदित्य चोप्रावर सनसनाटी आरोप केला आहे. “तू आता संपलीस” या शब्दांत आदित्य चोप्राने आपल्याला धमकी दिली होती, असं कंगना म्हणाली. ‘यशराज’चा चित्रपट नाकारला म्हणून आदित्य चोप्राने आपल्याला धमकावलं होतं, असा तिचा आरोप आहे.

यशराज फिल्म्सच्या सुलतान नावाच्या चित्रपटाबद्दल आपल्याला विचारलं होतं. सलमान खानबरोबरचा हा चित्रपट मी नाकारला. तेव्हा आदित्य चोप्राला राग आला आणि त्याने धमकावलं, असं कंगनाने रिपब्लिक टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. “तनू वेड्स मनूसारखा चित्रपट माझ्या एकटीच्या जिवावर चालला होता. त्यामुळे त्यापुढे आता कुठल्याही खानांबरोबरचा चित्रपट करायची माझी इच्छा नव्हती. म्हणून मी चित्रपट नाकारला,” असं कंगना म्हणाली.