बीड

राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय!

18 July :- राज्यात कोरोना विषाणूने केलेल्या कहाराचा दाज घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी सर्व राज्यातला आढावा घेण्यात आला. या बैठकीत आरोग्य मंत्री राजेश टोपेही उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी कोरनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. प्रत्येक गावात आता COVID दक्षता समित्या स्थापन करण्याचा महत्त्वाचा निर्णयही सरकारने घेतला आहे.

महिला रुग्णांसाठी महिला पोलिस सुरक्षा तैनात करणार असून सेंटर्समध्ये सीसीटीव्हीही लावण्यात येणार आहे. पनवेल मधल्या घटनेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

टोपे म्हणाले, या बैठकीत राज्यातल्या कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. सगळी परिस्थिती लक्षात घेऊन काही निर्णय घेण्यात आले आहेत. त्यात राज्यात यापुढे लॉकडाऊनची वेळ न आणता टप्या टप्याने दैनंदिन व्यव्हार सुरळीत कसे होतील याकडे सरकारचा कल असेल.