भारत

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नवा मंत्र!

१७ जुलै :- पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या समारोप अधिवेशनास व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले कोरोना विरुद्ध लढण्यासाठी संपूर्ण देश एकत्र आला. त्यामुळेच जगाच्या तुलनेत भारतात कोरोनाचं प्रमाण नियंत्रणात आहे.

आत्मनिर्भर भारत अभियानाची सुरुवात भारताने आता केली आहे.”सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास” हा नवा मंत्र आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.


पंतप्रधान म्हणाले की,
आमच्या सरकारने सर्व नागरिकांना घरे मिळवून देण्यासाठी ‘हाऊसिंग फॉर ऑल स्कीम’ सुरू केली आहे. यामुळे 2022 पर्यंत सर्व नागरिकांना स्वतःचे घर असेल याची खात्री आहे,
2025 पर्यंत टीबी पूर्णपणे नष्ट करण्याचे लक्ष्य आहे,


2030 पर्यंतचे निश्चित केलेले उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी भारत पूर्णपणे प्रयत्न करीत आहे. आम्ही विकसित देशांची मदत करत आहोत. आमचं उद्दिष्टच सबका साथ, सबका विकास और सबका विश्वास आहे,


भारत प्रत्येक क्षेत्रात पुढे पाऊल टाकत आहे. आम्ही महिलांना सशक्त बनवण्यासाठी सर्वांगीण दृष्टीनं प्रयत्न करत आहोत. त्याचबरोबर गरजू लोकांच्या खात्यात थेट पैसे जमा केले आहेत,
गरजूंना अन्न देण्यासाठी सरकारनं अन्न सुरक्षा योजना आणली. या अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून 830 मिलियन भारतीयांना लाभ मिळत आहे,