महाराष्ट्र

राज्यात मृत्यू दर घसरला;मात्र नव्या रुग्णांची भर चिंताजनक

15 जुलै: राज्यात झपाट्याने वाढणारी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या चिंताजनक असली तरीही दिलासादायक बाब म्हणजे राज्याचा मृत्यू दर घसरला असून तो 3.96 टक्क्यांवर आला आहे.राज्यात आजही विक्रमी संख्येत नव्या रुग्णांची वाढ झाली आहे.गेल्या 24 तासांमध्ये राज्यात 7975 एवढ्या रुग्णांची भर पडली. तर 233 जणांचा मृत्यू झाला.

राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 2,75,640 वर गेली असून मृत्यूचा आकडा 10928वर गेला आहे. आज एवढ्या जणांना सुटी देण्यात आली आहे. राज्यातल्या ACTIVE रुग्णांची संख्या 1,11,801 एवढी झाली आहे.
काळजी घ्या…गर्दी टाळा…मास्क वापरा…सोशल डिस्टन्स ठेवा…प्रशासनाच्या सूचनेचं पालन करा!