राजकारण

मंत्री बनल्याने शहाणपण येत नाही;फडणवीसांचा टोला

राजकारण म्हंटल कि आरोप-प्रत्यारोप आलेच देवेंद्र फडणवीस हे राज्याचा दौरा करत आहेत. या दौऱ्यावर आदित्य ठाकरे यांनी टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, ‘नया है वह’.

मुख्यमंत्र्यांना जे योग्य वाटतात त्यांना मंत्री बनवता येते, पण मंत्री बनवल्याने शहाणपण येतच असं नाही. ठाकरे सरकार पाडणार असल्याचा कांगावा स्वतः त्यांचेच लोक करत आहेत. कोरोना वर अपयशी ठरल्यामुळे ते लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.