राजकारण

संजय राऊतांचं भाजपला रोकठोक चॅलेंज!

12 July :- राजकारण म्हंटल कि आरोप – प्रत्यारोप आलेच,महाविकास आघाडी सरकार वर कायम विरोधी पक्षनेते फडणवीस टीका करतच असतात आणि या टीकेचं खडसून उत्तर द्यायला संजय राऊत कधीच चुकत नाहीत.राऊत – फडणवीस यांच्यातलं द्वंद सर्वांनाच माहित आहे. मध्य प्रदेशपाठोपाठ राजस्थानमध्ये सत्ताबदलाच्या जोरदार घडामोडी घडू लागल्या आहेत.

भविष्यात महाराष्ट्रातही अशा पद्धतीचं वातावरण निर्माण होईल का? यावर संजय राऊत म्हणाले महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार मजबूत आहे, त्यामुळे सरका कोणी पाडायचा प्रयत्न करू नये. हिंमत असेलच तर आमचं सराकर पाडून दाखवावं,महाराष्ट्रालं सरकार पाडायला भाजपला मुहूर्त शोधावा लागेल. सत्ता बदलायला साडेतीन मुर्हूताची गरज नाही. असं रोकठोक चॅलेंज संजय राऊत यांनी भाजपला दिलंय.