महाराष्ट्र

रिकव्हरी रेट वाढला;रुग्णवाढ सुद्धा उच्चांकी

9 July :- कोरोना…कोरोना…आणि फक्त कोरोनाच… कोरोना सर्वत्र पाहावयास मिळत आहे.प्रशासन दिवसरात्र आपली आहे तेवढी ताकद,अक्कल,युक्त्या पणाला लावत आहे.मात्र कोरोनाचा कहर राज्यात काही केल्या कमी होत नाहीए.राज्यात गेल्या 24 तासांमध्ये 6 हजार 875 कोरोना रुग्ण समोर आले आहेत.राज्यात आज रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 55 टक्के आहे. राज्यात करोना मृत्यु प्रमाण 4.19 टक्के आहे तर एकूण केलेल्या चाचण्यात पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या 18 . 86 टक्के इतकी आहे.राज्यात एकूण रुग्णांची संख्या 2 लाख 30 हजार 599 वर पोहोचली आहे.