राजकारण

नगरसेवक शिवसेनेत परतले!

8 जुलै :-
शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना रुचलेलं नव्हतं.दोन्ही पक्षांमध्ये तणाव निर्माण झाल्याची चर्चा होती. तसंच शिवसेनेचे नगरसेवक परत पाठवा असा निरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांना पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली होती.

मुख्यमंत्री यावरुन नाराज झाल्याचं म्हटलं जात होतं. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये यावर चर्चा झाली. त्यातच काल अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली होती. त्यानंतर आज हे पाचही नगरसेवक शिवसेनेत परतले आहेत.शिवसेनेचे पाच नगरसेवक भाजपमध्ये जात होते, म्हणून राष्ट्रवादीत घेतले.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नगरसेवकांची नाराजी ऐकली, ती दूर करण्याचे आश्वासनही दिल्याचं निलेश लंके यांनी सांगितलं.