सिनेमा,मनोरंजन

करण जोहर खचला!

७ जुलै :- हिंदी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणानंतर सोशल मीडियावर दिग्दर्शक,निर्माता म्हणून सुप्रसिद्ध असणाऱ्या करण जोहरला प्रचंड प्रमाणात ट्रोल करण्यात आले.करण जोहर नेहमी स्टार किड्स सोबतच काम करतो अशा अनेक टीका सोशल मीडिया युजर्सनी केल्या त्याचबरोबर बॉलिवूडमधील अनेक जवळच्या कलाकारांनी देखील टीका केल्या आहेत.करण जोहरला बहुबाजूंनी ट्रोल केल्यामुळे कारण पूर्णपणे खचला आहे.भरपूर वेळ रडला देखील असल्याचे माहिती करण जोहरचा मित्रांनी दिली आहे. सुशांतच्या निधनानंतर करणने सोशल मीडियावर त्याच्याबाबत एक पोस्ट शेअर केली होती. मात्र सोशल मीडियावर कायम सक्रीय राहणाऱ्या करणने त्यानंतर कोणतीच पोस्ट शेअर केली नाही. त्यानंंतर त्याचे फॉलोअर्स कमी झाल्याचे देखील काही मीडिया अहवालांनी सांगितले आहे.  एका अहवालानुसार करणच्या एका खास मित्राने त्याच्या परिस्थितीचा खुलासा केला आहे.