राजकारण

उद्धव ठाकरेंचा पवारांना निरोप!

६ जुलै :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरें समोर एका वेळी अनेक संकट उभी राहत आहेत.या सगळ्या संकटांशी तोंड देत उद्धव ठाकरे पुढे चालत आहेत.पारनेरमधील 5 शिवसेना नगरसेवकांनी शिवसेनेला सोडून अचानक अजित पवारांच्या उपस्थितीत ४ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पारनेर नागरपंचायतीतील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेले पक्ष प्रवेश उद्धव ठाकरेंना फार रुचलेले दिसत नाही.

पारनेरमधील शिवसेनेचे पाच नगरसेवक परत पाठवा, असा निरोप उद्धव ठाकरे यांनी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यामार्फत फोन करून अजित पवार यांच्यामार्फत पोहोचवला असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.या कारणांवरून महाविकास आघाडीत धुसमुस वाढू नये यासाठी शिवसेनेने फुटलेल्या नगरसेवकांना परत पाठवण्याचा निरोप अजित पवार यांना दिल्याची माहिती मिळत आहे.