महाराष्ट्र

48 तासात 19 कोरोनाबाधितांचा मृत्यू!

१ जुलै :- कोरोनाचा वाढत कहर आटोक्यात अंत अंत प्रशासनाच्या नाकी नऊ आले आहेत.मात्र अजूनही कोरोनाचा कहर वाढतच आहे.कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे सुद्धा प्रमाण आता वाढू लागले आहे.जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसात कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने मोठी वाढ होताना दिसत आहे तर दुसरीकडे मृत्यूचा आकडाही वाढत असल्याच पाहायला मिळत आहे. गेल्या 48 तासांचा विचार केला तर संपूर्ण जळगाव जिल्ह्याच्या विविध कोविड सेंटरमध्ये 19 रुग्णांचा जीव गेल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
काळजी घ्या…गर्दी टाळा…मास्क वापरा…सोशल डिस्टन्स ठेवा…प्रशासनाच्या सूचनेचं पालन करा!