राजकारण

मोदींमुळेच देश सुरक्षित-फडणवीस

28 जून : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र जनसंवादाअंतर्गत भाजप मुंबई कोकण संवादाचे आयोजन केलं आहे. यावेळी फडणवीस बोलत होते. भाजपच्या या व्हर्च्युअल रॅलीत भाजपतील मोठ मोठे नेते सहभागी झाले होते.यामध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणीदेखील सहभागी झाल्या आहेत.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या संकटात योग्य निर्णय घेतले.त्यांनी देश सुरक्षित ठेवला.मोदींजींनी भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी उपाययोजना केल्या. जे म्हणाले ते करुन दाखवलं. मोदींसारख्या कणखर नेतृत्वार देश सुरक्षित असल्याची भावना फडणवीसांनी यावेळी व्यक्त केली.