महाराष्ट्र

आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा!

२७ जून :- कोरोना महामारीच्या वाईट काळात सर्व सामान्यांच्या बचावाकरीत कोरोनाशी झुंझ देण्यासाठी स्वतःच्या जीवाची स्वतःच्या परिवाराची चिंता न करता रस्त्यावर उतरून जनतेच्या संरक्षणार्थ दिवसरात्र काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे कौतुक राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले.सोलापूर जिल्ह्यातील कोरोना संसर्ग परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राजेश टोपे आले आहेत. त्यावेळी ते बोलत होते. सर्वजण एकत्रित येऊन व्यवस्थित काम करत आहेत. मात्र, यावेळी काही पोलिसांचा मृत्यू देखील झाला. राज्यशासन त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. सोबतचं ज्या पोलिसांनी उत्कृष्ट सेवा केली, त्यांना “शौर्य पुरस्कार” देणार असल्याची घोषणा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील कोरोना संसर्ग परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राजेश टोपे आले आहेत. त्यावेळी ते बोलत होते.