महाराष्ट्र

आरोग्य मंत्र्यांची लॉकडाऊन बाबत मोठी घोषणा!

२६ जून :- राज्यात दिवसेंदिवस वाढत्या कोरोनाबाधित रुग्ण संख्येची चिंता नसून वाढत्या मृतांची आकडेवारी मुळे चिंता वाढत असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले असून केंद्र असो वा राज्य आता विषय लॉकडाऊनचा नाही तर अनलॉकचा असेल.राज्यात आता अनलॉक 2-3 असेल, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.कोरोनामुळं झालेला एकही मृत्यू लपवला नसल्याचंही यावेळी त्यांनी स्पष्ट केलं. महाविकास आघाडी सरकारचा कारभार पारदर्शक आणि प्रामाणिकपणे सुरु असंही ते म्हणाले.