Popular News

चीनच्या सीमेजवळ भारताची लढाऊ विमाने तैनात!

२६ जून :- भारत-चीन सुरू असलेल्या सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर लष्कराने मोठा निर्णय घेतला असून चीनच्या सीमेजवळ भारताची लढाऊ विमाने तैनात करण्यात आली आहेत.चीनच्या मुजोरीला उत्तर देण्यासाठी लष्कर आणि हवाई दलाने लेह-लडाखमध्ये संयुक्त युद्ध सरावाला देखील सुरुवात केली आहे. याच भागात चीनच्या लष्कराने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता.त्यानंतर वाद निर्माण झाल्याने लष्कराने हा निर्णय घेतला आहे.