महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांचं पंतप्रधानांना पत्र

२५ जून :- कोरोना विषौनूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने व्यावसायिक आणि अव्यसायिक या दोन्ही अभ्यासक्रमाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्ष, अंतिम सत्राच्या परीक्षेबाबतचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. सध्याची कोरोनाची स्थिती पाहता पंतप्रधानांनी या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या नियंत्रक संस्थांना आवश्यक सूचना द्याव्यात आणि या नियंत्रक संस्थांनी त्यानुसार मार्गदर्शक सूचना जारी करुन परीक्षा रद्द करण्यावर शिक्कामोर्बत करावं असं मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटलं आहे.