महाराष्ट्र

हॉटेल व्यवसायकाची आत्महत्या

२५ जून :-लॉकडाऊन दरम्यान सर्व व्यवसाय,धंदे बंद असल्यामुळे व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.सध्य स्थिती लॉकडाऊन हटवले गेले असले तरी ग्राहक नसल्यामुळे व्यावसायिकांचे तीन तेरा झाले आहेत.यामुळे आयुष्यात आलेल्या नैराश्यातून माणसं विक्षिप्त बनत चालल्याचे चित्र सध्या दिसू लागले आहे.पुण्यातील प्रेमनाथ शेट्टी या हॉटेल व्यवसायिकाने धायरी परिसरातील राज या हॉटेलमध्ये गळफास लावून त्यांनी आत्महत्या केली.सकाळी साधारण 9 वाजताच्या दरम्यान शेट्टी यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.शेट्टी यांनी हॉटेल भाड्याने घेतलं असून ते या हॉटेलचे मॅनेजर होते. मात्र प्राथमिक अंदाजानुसार, मानसिक नैराश्य आणि लॉकडाऊनमुळे आलेला तणाव यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.