महाराष्ट्र

अखेर परीक्षा रद्द!

२५ जून :- सीबीएसई 1 ते 15 जुलै दरम्यान होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. सीबीएसई बोर्डाने आज सर्वोच्च न्यायालयात ही माहिती दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा घेण्यास महाराष्ट्र, दिल्ली आणि तामिळनाडू या राज्य सरकारांनी परीक्षा घेण्यास असमर्थता दर्शवली होती. विद्यार्थ्यांना अतंर्गत मूल्यांकनावरून दिलेला निकाल स्वीकारणं किंवा सर्व परिस्थिती सुरळीत झाल्यावर पुन्हा परीक्षा देणं हे पर्याय असल्याचंही सीबीएसईमार्फत स्पष्ट करण्यात आलं. या दोन्हीमधून एका पर्यायाची निवड करण्याचं स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना असणार आहे.