बीड

दहावी, बारावी निकालाची प्रक्रिया वेगाने सुरु!

२२ जून :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत शिक्षण विभागाची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली, त्यावेळी त्या बोलत होत्या.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आलं होत. या लॉकडाऊनचा परिणार शिक्षण व्यवस्थेवरही झाला आहे. शैक्षणिक वर्ष सुरु झालं असलं तरी अद्याप शाळा, कॉलेज सुरु झालेले नाहीत. दहावी-बारावीचा निकालही अद्याप लागलेला नाही. विद्यार्थी आणि पालक त्याची वाट पाहत आहेत. जुलैच्या मध्यावधीत बारावीचा आणि जुलै अखेर दहावीचा निकाल लागू शकतो, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिली.
दै.झुंजारनेता लाईव्ह,बीड